कॉलेज

Started by Sachin01 More, September 05, 2014, 11:30:12 AM

Previous topic - Next topic

Sachin01 More

कॉलेज मध्ये कसलेच नसते नॉलेज
सगळ्यांनाच वाटत कराव लव्ह मॅरेज
पण कॉलेज नंतर सुरु करावच लागत गॅरेज
कॉलेजची प्रत्येक मुलगी जेव्हा वाटू लागते खास ,
शेवटी कॉप्या पुरवुनही होतात एटी-केटी वर पास ,
मुलीही देत नाहीत भाव,
शेवटी मुलेही घोषणा देतात 'चले जाव '
लेक्चर्स मध्ये यांचे येणे ठराविकच असते.
दिसले हे कि शिक्षकांचे डोके ठिकाण्यावर नसते .
पास होण्यासाठी करतात हे कुणाचाही सत्कार ,
पेपर नाही दाखवला त्याची धुलाई होते फार,
कॉलेजच असत त्यांच्या हातात,
फुकटे सारे गेटला जमा होतात,
हुषार मुलेही आता प्रेमात पडतात,
नाही म्हटलं तरी ते कधीतरी कोसळतात,
घरी समजल की होतो स्वप्नांचा चकनाचूर.
   .... S.S.More
Moregs