ऐतिहासिक

Started by rajatdeshmukh, September 18, 2014, 12:32:27 PM

Previous topic - Next topic

rajatdeshmukh

काळोख होत चाललाय
आता मात्र दिवा पाहिजे,
या वज्ररुपी महाराष्ट्राला
वाघीणीचा छावा पाहिजे,
नेते झाले शायिस्तेखान, अफजलखान, निजामखान,
मात्र तानाजीसारखा साथीदार पाहिजे,
आश्रयाला जिजाऊ च्या जवळ गेले
भक्तीपोटी भवानी मातेच्या शरण गेले,
तरी नाही मिळाले या महाराष्ट्रात हक्काचे स्थान,
   आतातरी या महाराष्ट्राला शिवबासारखा   
तडफदार युवा पाहिजे.

                           रजत अनिल देशमुख