चार ओळी

Started by Pravin Raghunath Kale, September 27, 2014, 05:32:55 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

नवनिर्माणाचा वादा हा
राजकीय अजेढा असतो
सत्तेसाठी दाखवलेला
आश्वासक आरसा असतो

राजकारणात आज
'स्व'च बळ आहे
हीच तर तुतीची
महत्वाची कळ आहे

जनतेसाठी कामे करणारा
पक्षच उरला नाही
टिका-टिप्पणीत रमताना
जनतेसाठी वेळच नाही

नवरात्रीचे नवरंग
राजकारणात उतरले आहेत
त्यामुळेच निवडणुकाही
रंगी-बेरंगी झाल्या आहेत

घटस्थापनेच्या मुहुर्थावर
राजकीय विस्फोट झाला आहे
मित्रपक्षला हरवण्याचा हा
राजकीय कट आहे


प्रविण रघुनाथ काळे
८३०८७९३००७