का करत असतील लोक आत्महत्या
काय चाललं असतं त्यावेळी मनात त्यांच्या.
जगाचा वैताग आलेला असतो की
स्वत:च्याच अविरत विचारांचा.
एकटेपणाला कंटाळलेले असतात की
लोकांच्या हजार प्रश्नांना.
संपवून आपले सारेच आयुष्य
कोणावर ते असा सूड उगवतात.
जगणंच त्यांना का इतकं
त्यावेळी असह्य झालेलं असतं.
करून आत्महत्या अखेर त्यांनी
असं काय साध्य केलेलं असतं.
- संतोषी साळस्कर.