असाच आज विचार करत बसलोमाझ्या आजवरच्या जीवनाचागोळाबेरीज मांडायला बसलोमाझ्याच आयुष्यातील शब्दफुलांचा...बेरजेत सगळे माझ्या गोळेच गोळे आले...कसेही सोडवले तरी,गणित माझे उणेच आले...करू तरी काय मी,माझी काय चुक...प्रत्येक गोष्टीला आज इथे एक नवा लुककाल जे सोपे होते,तेच आज कठीण झालेकठीण का झाले शोधता शोधताआयुष्य माझे शून्य झाले.....कळले जेव्हा शून्यातच धावतोयअर्थच माझ्या जीवनाचे सारे तेव्हा अर्थहीन झाले...उपदेशांच्या भडिमारांचा पिरयामिड रचला लोकांनी...शपथेवर मला आणि अपेक्षांनाही जगवला लोकांनी...पण साला पिरयामिड पत्त्यांचाच डोलारा निघाला...माझ्याच खांद्यावर अपेक्षांचा तेव्हा छानपैकी'जनाजा'निघाला...पण मित्रांनो,तेव्हाही तिथे एक कुणीतरी नाचत होतमाझ्याच नावाने मनापासून साखर कुणी वाटत होतंपालवीच्या पानांमागे चंद्र जेव्हा लपत होतामाझ्यासाठी कुणीतरी तेव्हा तीळ तीळ मरत होतं...मग कळले तेव्हा मला,गणितात मी मध्यात होतो...काही उण्या अंकाचीच बेरीज मी करत होतो...मग म्हटले जाउदे साला,पेपरच कठीण आहे...अजून बराच वेळ आहे,आपल्याला कुठे घाई आहेआता मात्र ठरवलयं मी हसतच जगणारमीही आता मनाने कुणासाठी साखर वाटणारअश्यामध्येच मित्रांनो एक फायदा असतोआपलं झाकून मनामध्येच सारया जगाला हसवण्याचा आनंद असतो.............................................................. संदिप उभळ्कर