जीवन आणि संसाराचा
विरह हा एक भाग असतो
म्हणूनच मनुष्य तेव्हां
आत्म परीक्षण करतो ।
संसारात होते वाटले
माणूस 'स्व' विसरून जातो
अनुभवास मात्र येते 'स्व'
तसाच कायम असतो ।
मी मला कसा,तसेच
दुसर्याला कसा वाटतो
ह्याचे ज्ञान प्राप्त होऊन
'मी' फार तोकडा पडतो ।
जर काहीं विसरत असेल
तर तो दुसर्यास विसरतो
त्याच्याकडे फक्त तो
एक छाया म्हणून बघतो ।
प्रीति,प्रेम,साथी हा
फक्त एक आभास ठरतो
भावनांनाही त्यांत अखेर
कुठे ही ना वाव उरतो ।
जीवनांत अशा विचाराला
कधींच कुठं थारा नसतो ।
पण 'मी-माझं' म्हण्णार्याला
तो विचार कधीं ना शिवतो
जीवनांत माणूस एकटा आहे
तो एकटाच रहात असतो ।
हेंच एक सत्य आहे
बाकी सर्व आभासच असतो ।
त्यांच आभासांत राहून
मनुष्य जीवन जगत असतो
संसार माझा सुखाचा
हेच भासवत असतो ।
म्हणूनच विरहांत जेव्हां
आत्म परीक्षण मी करतो
प्रीति -संसारावरील सारा
विश्वासच उडून जातो ।।
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/02/miscellaneous_9.html (http://www.kaviravi.com/2013/02/miscellaneous_9.html)