......आशेवरच जगायचे.....
.
.
.
वाळवंटातल्या उन्हातले,
दाह कुणी सोसायचे...??
पिसाटलेल्या वाय्रासंगे,
भोग कुणी भोगायचे...??
.
.
.
भेगाळलेल्या जमिनीच्या,
चिरा कुणी बुजवायच्या...??
आभाळंच फाटले जिथे,
ठिगळ कुणी लावायचे...??
.
.
.
मनातल्या चिय्राभधले,
सांधे कुणी सांधायचे...??
रापलेल्या मनामध्ये,
कापरे कुणी भरायचे...??
.
.
.
सारे जर असेल असेच,
तुम्ही-आम्ही तडफडायचे...??
पालवी फुटेल कधी तरी,
म्हणुन आशेवरंच जगायचे...??
.
.
. UNKNOWN.....
भेगाळलेल्या जमिनीच्या,
चिरा कुणी बुजवायच्या...??
आभाळंच फाटले जिथे,
ठिगळ कुणी लावायचे...??
.
.
oli avdlya....
kaviraj naav liha....
रुद्रा सदरची कविता ही मला एका पानावर सापडली जो किराणा दुकानाच्या खाऊ सोबत होता ... SORRY , UNKNOWN लिहायचं राहीलं.....
अप्रतिम कविता ! :)
THANKS सुनिता
छान आहे कविता
''कवीचे नाव माहिती होईल ...या आशेवर जगायचे !!!''
vijayaji मिळुन शोधुया.