मी आणि प्रेम
वाटेवरती सहजच एकदा
मला जेव्हा प्रेम दिसला,
नजर चुकवून मी जावू लागली
तर तो वाटच माझी अडवू लागला.
मी म्हणाली काय आहे
वाटेत का असा आडवा येतोस,
पुन्हा नजरेसमोर येवून
का मला असा त्रास देतोस.
तो म्हणाला :
म्हणटलं आता सरळ
तुलाच जावून विचारुया,
माझ्याबद्दलच्या कडवटपणाचं
रहस्यतरी तुझ्याकडून जाणुया.
फक्त नाण्याची एक बाजु बघुन
तू अख्ख नाणं खोटं ठरवतेस,
म्हणूनच आलोय मी तुला न्यायला
माझ्या बाबतीतलं तुझं मत बदलायला.
तुच आंधळेपणाने
कुणाच्याही प्रेमात पडतेस,
दोष मात्र नंतर त्याचा
मलाच देत बसतेस.
का असते तुला खरंच
प्रत्येक गोष्टीत इतकी घाई,
प्रेमात का ग पडतेस तू
नेहमीच इतक्या लवकर बाई.
प्रेमाची कबुली देण्याआधी
नीट पारख त्या व्यक्तीला,
खरंच देईल का तो शेवटपर्यंत साथ
विचार आधी स्वत:च्या मनाला.
आकर्षणालाच खरंतर तू
प्रेमाचं नाव देतेस,
क्षणाक्षणाला मग त्यात
असंख्य चुका करतेस.
आनंदाचीही आहे गं
एक चांगली बाजू मला,
पण दुखं, अंश्रु आणि विरहच
का बरं दिसतात तुला.
मनातून काढुन टाक राणी
आतातरी माझ्यावरचा राग,
चल करु पूर्वीसारखी मैत्री
यापुढे शहाण्यासारखी वाग.
- संतोषी साळस्कर.
tari he lok manus olakhnyath phasstat..do write more..liked this one.
mast watl...