Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: सागर बिसेन on August 31, 2016, 09:41:35 PM

Title: व्यथा
Post by: सागर बिसेन on August 31, 2016, 09:41:35 PM
"व्यथा"

तंत्रज्ञानात जगतोय म्हणे!
माझा हा भारत देश।
काळ उलटले,वर्षे संपली,
अजूनही बदलला नाही भेष।।

राजकारणावरही राजकारण झाले,
अनेक नवनवे पक्ष आले।
मत देत देत राजकारण्यांना,
सामान्यजण सारे बेजार झाले।।

शासन येते, जाते अनं बदलते,
नवनवी धोरणे जातात आखली।
योजना साऱ्या कागदांवरी राहता,
कार्यपद्धतीची तव कंबर वाकली।।

आशान्वित इथे शेतकरी,
भुकेला झोपतोय माझा बळीराजा।
राबणारा मातीच्या घरातच राहिला,
चैनीत विसावणारा बनला राजा।।

हि व्यथा आहे सर्वांची,
हे चित्र आहे 'महाराज्याचे'।
हि काव्य आहे संपूर्ण भारताचे,
भारत मातेच्या व्याकुळ जनतेचे।।

©सागर बिसेन
३१/०८/२०१६
९४०३८२४५६६