तुझ्याशिवाय आयुष्य खरंच खूप छान होत,
माझं एकट्याच स्वच्छंदी असं राहणं होतं.....
नातेवाईक ट्रिप, ट्रेक आणि मित्र,
इतकं साधं होतं माझ्या जीवनाचं सूत्र.....
एक दिवस तुला बघितलं आणि प्रेमाची घंटी वाजली,
त्यानंतर काय विचारा, माझी प्रेम कहाणी किती गाजली.....
तू आयुष्यात आल्यावर सगळच अचानक बदललं,
माझा विश्व आता तुझ्याभोवती फिरू लागलं.....
पूर्वीच्या गर्दीत आता तुझ्याशिवाय उगाचच एकाकी असतो मी.....
पण तुझ्याबरोबरच्या एकांतात तुझीच लाखो रूपे बघतो मी.....
आज तू आहेस, मी आहे आणि आहे हा मधहोष एकांत,
आज तोडूया सगळे बंध, होऊ दे ती हुरहूर शांत.....
मग माझच मन सांगत की, खरी मजा बंधनात आहे,
वाहत जातात ओहळ देखील, पण स्थिरता सागराच्या स्पंदनात आहे.....
आता आयुष्याला तुझ्यामुळेच अर्थ आहे, तू नसलीस तर जीवन काय,
मृत्यू देखील व्यर्थ आहे.....
- Author unknown