विषय :गोंदियात विना -हेल्मेट गाडी चालविण्याऱ्यांवर कारवाई
वास्तव -गाडी चालक सुरक्षा चारोळ्या
( ट्राफिक पोलिसांचे मनोगत )
"हेल्मेट घाला,वाहन नीट चालवा,अपघात टाळा,स्वतःला वाचवा"
----------------------------------------------------------
(1)
तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच उचलली जाताहेत ही पाऊले
यामध्ये कुणाचाही काहीही नाहीय स्वार्थ , स्व -हित
चालकांनो , जिथे तुम्हालाच आहे "हेल्मेट" घालण्याचे वावडे ,
चूक आहे तुमचीच , "ट्राफिक पोलीस" त्यांना देताहेत शिस्तीचे धडे .
(2)
पुढे होऊ नये चूक तुमच्याकडून , म्हणून ही खबरदारी
पावती फाडल्यावर राहील लक्ष्यात , तुमची ही जबाबदारी
घरून निघतानाच "हेल्मेट" जरूर स्वतःबरोबर बाळगावे ,
नुसते बाळगू नये , तर ते डोक्यावरही परिधान करावे .
(3)
आम्हालाच वाईट वाटतं , तुमच्याकडून दंड वसूल करताना
पण काय करावे , आमची ही ड्युटी आहे , आम्हालाही दिलेत निर्देश
"हेल्मेट" घाला , अपघात टाळा , झाला तर तुम्हालाच ते वाचवेल ,
ईजा झाली धडालाच तरी डोके नक्कीच सुरक्षित असेल !
(4)
कृपया रहदारीचे सारे नियम पाळा प्रकर्षाने , चालकांनो
स्पीड लिमिट ठेवा , तुमच्यावर आहे आमचे लक्ष
वेळीच तुम्हाला सावध करतोय , तुमची काळजी वाहतोय सर्वथाही ,
वाचवतोय आम्ही तुम्हाला , काळाने करण्याआधीच तुम्हाला भक्ष .
(5)
या कारवाईचा चालकांनो , राग मानू नका , दुट्टपी वर्तन करू नका
आम्हाला सहकार्य द्या , तुमच्यासाठीच आम्ही उभे आहोत भर उन्हात
मनमानी न करता ,रस्त्यावरचे नियम ,कायदा कसोशीने पाळा ,
जीवन आहे मूल्यवान , एकदाच मिळते , "हेल्मेट" घाला , शक्यतो अपघात टाळा !
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2022-गुरुवार.