"२० सप्टेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, September 20, 2021, 04:39:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०९.२०२१-सोमवार . जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "२० सप्टेंबर – दिनविशेष"
                                    -------------------------


अ) २० सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
   -----------------------------

१६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.

१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

१९१३: वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.

१९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.

१९७३: टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.

१९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

२००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.

=========================================

ब) २० सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
   --------------------------

१९५२: भारतीय अणु वैज्ञानिक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष शेखर बासू यांचा जन्म. (निधन: २४ सप्टेंबर २०२०)

१८५३: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०)

१८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)

१९०९: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून २००६ – पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)

१९११: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म (मृत्यू: २ जून १९९०)

१९१३: कवी वा. रा. कांत यांचा जन्म.

१९२१: क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म.

१९२२: चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.

१९२३: भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म (मृत्यू: २२ जानेवारी २०१४)

१९२५: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचा जन्म (मृत्यू: ९ जून १९४६)

१९३४: इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लाॅरेन यांचा जन्म.

१९३४: भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)

१९४२: रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम करणारे भारतीय क्रिकेटपटू राजिंदर गोयल यांचा जन्म (मृत्यू: २१ जून २०२०)

१९४४: क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म.

१९४६: भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.

१९४९: चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म.

१९०९: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९०६ – पुणे)

=========================================

क) २० सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
    --------------------------

१८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.

१९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१)

१९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.

१९३३: विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अ‍ॅनी बेझंट यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८४७)

१९७९: चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा यांचे निधन.

१९९६: कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन.

१९९७: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचे निधन. (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ – खांडवा, मध्य प्रदेश)

२०१५: भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन. (जन्म: ३० मे १९४०)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2021-सोमवार.