II होळी II-निबंध क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 12:07:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                            II होळी II
                                         निबंध क्रमांक-3
                                        ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

                          होळी निबंध---

     होळी हा भारतातील एक मुख्य आणि प्राचीन सण आहे, जो आज जगभरात प्रसिद्ध आहे. हा सण दरवर्षी हिंदू फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या सणाला रंगांचा सण असेही म्हणतात. होळी सणाच्या काळात निसर्गात वसंत ऋतुमुळे काही चांगले बदल झालेले असतात, त्यामुळे या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा करतात.

     हा सण २ दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी संध्याकाळी होलिका दहन केले जाते, या होलिका दहनाची एक पौराणिक कथा आहे. प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक असुर होता. हिरण्यकश्यपू भगवान विष्णूचा द्वेष करीत असे परंतु हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद विष्णूचा परम भक्त होता. हे हिरण्यकश्यपूला आवडत नसे.

     हिरण्यकश्यपूने आपला मुलगा प्रल्हादला ठार मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. शेवटी हिरण्यकश्यपूने आपली लहान बहीण होलिकाला बोलावले. होलिकेला आगीतही भस्म न होण्याचे वरदान मिळाले होते. हिरण्यकश्यपूच्या आज्ञेनुसार होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन आगीत बसली, भगवान विष्णूला ते आवडले नाही आणि त्याच आगीत होलिका त्याच आगीत भस्म झाली. म्हणूनच आपण होलिका दहन करतो.

     होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळून धुलीवंदन साजरे केले जाते. या दिवशी लोक आपापसातले सर्व मतभेद विसरून एकत्र येतात, एकमेकांना रंग लावतात. या दिवशी लोक घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतात. लोक रंग लावून एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात, संगीत वाजवून, नृत्य करून लोक आनंद व्यक्त करतात. सगळीकडे आनंद व उत्साहाचे वातावरण असते.

     या सणाच्या निमित्ताने लोकांचे आपापसातील वाद नष्ट होऊन त्यांच्यातील प्रेम वाढते. हा सण केवळ हिंदूच नव्हे तर सर्व समाजातील लोकही आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. म्हणूनच या सणाला प्रेमाचा आणि बंधुत्वाचा सण देखील म्हटले जाते.


--अमर शिंदे
------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-एसे ऑन मराठी.कॉम)
                 ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.