मला आवडलेला लेख-विश्वास ठेवा-अ

Started by Atul Kaviraje, August 15, 2022, 08:42:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "मला आवडलेला लेख"
                                   ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     मला आवडलेला लेख, या लेख-मालिका विषया-अंतर्गत आज वाचूया एक विशेष लेख- "विश्वास ठेवा"

     किती छोटा शब्द ना जो श्वासाप्रमाणे जपणे आवश्यक आहे तोच विश्वास असतो, आणि म्हणूनच त्याला वि-श्वास म्हणत असावे कदाचित जशी श्वासाची हमी नाही कि तो केव्हा बंद होईल तसेच हल्ली विश्वासाचे झालेले आहे, कोण कधी तुमचा विश्वास तोडेल याचा ही काहीच नेम नाही. आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो म्हणजे काय करतो, तर ही व्यक्ती मला कधीच फसवणार नाही, कधी आणि कुठल्याच परिस्थितीत दगा देणार नाही, याची आपल्या मनाशी खुणगाठ बांधून ठेवतो, आपण विश्वास ठेवतो म्हणजे आपण समोरच्याच्य तुम्ही जेव्हा या जगाचा निरोप घ्याल तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या अशा व्यक्तीची संख्या मोजा, ज्यांनी तुम्ही विश्वास हे विविध वस्तूंशी, व्यक्तींशी, अन्य प्राण्यांशी, विचारप्रणालींशी, मूल्यांशी, तत्त्वांशी किंवा अद्‌भूत, कल्पित मानल्या जाणाऱ्या विषयांशीही जडणारे भावनात्मक नाते आहे. 'ईश्वराच्या अस्तित्वावर माझा विश्वास आहे', 'त्या माणसाच्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास आहे', 'तुम्ही निश्चितपणे विजयी व्हाल, असा मला विश्वास वाटतो', अशी वा अशा प्रकारची विधाने दैनंदिन जीवनात आपण अनेकदा ऐकतो. त्यांचा आशय लक्षात घेतला, तर 'विश्वास' ह्या शब्दाचा अर्थ 'खात्री', 'श्रद्धा' ह्या शब्दांच्या अर्थाजवळ येतो, असे दिसून येईल. विशेषत: ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला 'श्रद्धा' हाच शब्द सामान्यत: वापरला जातो.

     विश्वास निर्माण करणारे काही घटक व्यक्तिमनाच्या बाहेरचे, तर काही व्यक्तीमनातले असतात. व्यक्तिमनाच्या बाहेरचे जे घटक असतात, त्यांत निरनिराळ्या स्त्रोतांपासून मिळालेली माहिती हा घटक विशेष महत्त्वाचा होय. उदा., दूरदर्शन, नभोवाणी, वर्तमानपत्रे ह्यांसारख्या प्रसारमाध्यमांतून जे संदेश पुन्हा पुन्हा दिले जातात, ते त्यांच्या प्रभावी सूचनक्षमतेमुळे त्यांच्यावरील विश्वास उत्पन्न करतात. उदा., दूरदर्शनवरील विविध उत्पादनांच्या जाहिराती. त्या पाहून ती उत्पादने अत्यंत दर्जेदार आणि खात्रीलायक गुणवत्तेची असली पाहिजेत असा विश्वास कित्येकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. तसेच वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेली वृत्तेही शंभर टक्के विश्वसनीय म्हणून अनेक लोक स्वीकारीत असतात.

     प्रत्यक्ष अनुभवामुळेही विश्वास निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणावरील इतरांचा विश्वास हा त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचा नेहमीच अनुभव येत गेल्यामुळे निर्माण झालेला असतो. अशा व्यक्तींनी पुरविलेल्या माहितीवरही विश्वास टाकला जातो. तथापि कधी कधी वृत्त पुरविणारी व्यक्ती वा माध्यम खात्रीलायक नसतेही. परंतु त्या स्त्रोतापासून वा सूत्रापासून मिळालेली माहिती ज्यांच्या सोयीची असते, त्यांचा तिच्यावर त्वरित विश्वास बसतो. काही व्यक्तींची एक विशिष्ट प्रतिमा निरनिराळ्या प्रसारमाध्यमांतून निर्माण करण्यात आलेली असते. त्या व्यक्ती प्रत्यक्षात कशा आहेत, ह्याचा काहीच अनुभव नसताना तीच प्रतिमा विश्वासार्ह म्हणून स्वीकारण्याची सर्वसामान्य माणसांची वृत्ती असते. एखादी राजकीय विचारप्रणालीही प्रसारमाध्यमांद्वारे केल्या जाणाऱ्या परिणामकारक प्रचारातून लोकहिताची कशी आहे हे दाखवून तिच्यासंबंधी लोकांचा विश्वास निर्माण केला जातो.

     अनेक लोक दीर्घकाळ जे करीत आले, ते इष्टच असले पाहिजे ह्या विश्वासामुळेच अनेक पारंपरिक चालीरीती कोणतीही चिकित्सा न करता स्वीकारल्या जातात. धर्मग्रंथांतील प्रत्येक वचनावरील विश्वास हा ह्याच पद्धतीने निर्माण झालेला असतो.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी-अनलिमिटेड.इन आर्टिकल्स)
            --------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2022-सोमवार.