व्यसन मुक्ती-व्यसनाधीनतेच्या पायऱ्या

Started by Atul Kaviraje, August 16, 2022, 08:16:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "व्यसन मुक्ती"
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     व्यसन मुक्ती या विषया-अंतर्गत आज वाचूया पुढील लेख-

                              व्यसन मुक्ती----

                     व्यसनाधीनतेच्या पायऱ्या----

वैद्यकीय दृष्टिकोनातून व्यसनाधीनतेच्या चार पाय-या आहेत.

1. तोंडओळख अथवा सुरुवात

2. सहज सेवनाची पायरी

3. सतत सेवनाची पायरी

4. व्यसनपतित अवस्था

1. अनेक व्यसनांची सुरुवात गमतीत होते. कधी मित्रमंडळीत गंमत म्हणून, कधी कुतूहल तर कधी धाडस म्हणून या पदार्थांचा संबंध येतो. ही झाली तोंडओळख. यापुढच्या पायरीत ती व्यक्ती स्वत:हून कधीकधी 'सहज' हे पदार्थ वापरून बघते. एकदा सतत सेवनाची पायरी गाठली, की ती व्यक्ती त्या पदार्थाच्या पूर्ण आहारी जाते. तो पदार्थ जर मिळाला नाही तर त्रासदायक शारीरिक, मानसिक लक्षणे दिसतात. उदा. सतत दारू पिणा-याला एखादा दिवस दारू मिळाली नाही तर अंगाची थरथर, उन्मादी अवस्था होते.

2. या पायरीवर व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेतही कायमचे बदल होत जातात. उदा. पैशासाठी खोटे बोलणे, चोरी, आक्रमकता, असहायता, इत्यादी गोष्टी स्वाभाविक होऊन जातात.

                  3. पतित अवस्था----

     या अवस्थेत व्यसनाधीन व्यक्तीच्या स्वभावात कायमचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होतात. उदा. दारू पिणा-यामध्ये यकृताला सूज येणे, हातापायांना मुंग्या येणे, मेंदूत कायमचे दोष तयार होणे, स्वभावात अनेक दोष स्थिर होणे, इत्यादी. या अवस्थेत कितीही मदत केली तरी ती व्यक्ती सुधारण्याची फारशी शक्यता नसते. अशी व्यक्ती समाजातून बाहेर फेकली जाते. तरीही आपण व्यसनमुक्तीचे प्रयत्न सोडू नयेत.

                         4. उपचार----

     पहिले सूत्र म्हणजे लवकरात लवकर व्यसन ओळखणे. विशेषतः गर्द, इत्यादी अतिमादक पदार्थांच्या व्यसनांमध्ये नंतर केलेले उपचार फारसे यशस्वी होत नाहीत. सहजसेवनाच्या पायरीवर व्यसन थांबवणे अगदी महत्त्वाचे असते. एकदा त्या पदार्थाच्या आहारी गेल्यावर व्यसन थांबवणे थोडया लोकांच्या बाबतीतच शक्य होते.

5. दुसरे सूत्र म्हणजे व्यसन रोखण्याबरोबरच इतर पूरक आधार देणे. रुग्णालयात दाखल करणे, रुग्णांच्या गटांवर एकत्र उपचार, मानसोपचार करणे, समाजात पुन्हा सुस्थिर करणे, मानसिक आधार देणे, इत्यादी प्रयत्न केले तर उपयोग होतो.

--प्राची म्हात्रे
-----------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हेल्थ.मराठीवारसा.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2022-मंगळवार.