मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-69-महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव

Started by Atul Kaviraje, January 15, 2023, 10:01:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-69
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव"

                            महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव--
                           -------------------------------

     दिनांक १०.०१.२०१३ रोजी मी पुण्याहून अहमदनगर, औरंगाबाद, वेरूळ मार्गे धुळे येथे येत होतो. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कन्नड घाट ओलांडून पुढे आल्यावर पोलिसांच्या तपासणी पथकाने माझे वाहन (मारूती ओम्नी एम एच १४ बीएक्स ६२८७) थांबविले. माझा वाहन चालविण्याचा परवाना मूळ स्वरुपात आणि वाहनाच्या दस्तऐवजांच्या प्रती छायांकित स्वरुपात तपासल्यावर तपासणी पोलिसाने मला वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात नसल्याबद्दल दंड भरावा लागेल असे सूचित केले. त्यावर मी खासगी वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात बाळगण्याची गरज नसून छायांकित प्रती चालतात हे त्यास सांगितले. तसेच यापूर्वी मला याच कारणाकरिता दंड आकारण्याची चूक करणार्‍या पुण्याच्या सी. एन. पवार या पोलिस उपनिरीक्षकाची मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून वाहतूक पोलिसांच्या उपायुक्तांनी चौकशी केल्याचे निदर्शनास आणून दिले. लोकसत्ता वृत्तपत्रातील संबंधित बातमीचे कात्रणही मी त्यास वाचावयास दिले. ते वाचल्यावर या कारणाने दंड आकारणे शक्य नसल्याचे त्याच्या ध्यानात आले. मग त्याने दंड आकारण्याकरिता नवाच मुद्दा शोधला; तो म्हणजे मी वाहन चालवित असताना आसन सुरक्षा पट्टा न लावल्याचा. त्यावर मी त्यास काही समजावू लागलो असता त्याने मला त्याचे वरिष्ठांना भेटण्याचा सल्ला दिला.

     महामार्गाच्या बाजूस थांबलेले पोलिस अधिकारी श्री. अंबादास सरोदे यांना मी भेटलो. आसन सुरक्षा पट्टा मी का लावू शकलो नाही याबद्दल मी त्यांना माझ्या परीने स्पष्टीकरण दिले. ते ऐकून त्यांनी मला दंड न आकारताच सोडण्याची तयारी दर्शविली. परंतू त्यांचा गैरसमज झाल्याचे माझ्या ध्यानी आल्याने मी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून माझा मुद्दा स्पष्ट केला. श्री. सरोदे यांस असे वाटले की मला मानेच्या मणक्यांचा काही आजार आहे व त्यामुळे मी आसनपट्टा लावण्यास असमर्थ आहे. तर मला असे सांगावयाचे होते की, सपाट रस्ता सोडून माझे वाहन इतरत्र धावू लागले की आसन पट्टा आपोआपच घट्ट होतो व त्यामुळे माझे खांदे, मान इत्यादी आसन पट्ट्याच्या संपर्कात येणार्‍या अवयवांना अस्वस्थता वाटू लागते. घाटात रस्त्याच्या विशिष्ट रचनेमुळे डावीकडील व उजवीकडील चाके वेगवेगळ्या क्षैतिजीय पातळीवर येतात. असे झाले म्हणजे माझ्या वाहनाचा आसनपट्टा अधिकच घट्ट होतो. घाटात वाहन चालविताना डावी उजवीकडे तसेच (डोंगरावरून दरड कोसळत नाहीये याची खात्री करून घेण्याकरिता) वर देखील पाहावे लागते. आसन पट्टा घट्ट झाल्यामुळे या कामी अडथळा येतो. मान अवघडल्यामुळे काही काळाकरिता आसनपट्टा सोडला तर पुन्हा वाहनाची दोन्ही चाके समपातळीत येईस्तोवर तो लावता येत नाही. त्यामुळेच मी घाटात एकदा सोडलेला आसन पट्टा पुन्हा वाहन सपाट रस्त्यावर येईपर्यंत लावू शकत नसल्याचे श्री. सरोदे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर श्री. सरोदे यांनी मला हा वाहनाचा दोष असल्याचे व त्यास शक्य तितक्या त्वरेने दुरूस्त करून घेण्याचे सूचविले.

--चेतन सुभाष गुगळे
(March 18, 2013)
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2023-रविवार.
=========================================