मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-99-महात्मा गांधी

Started by Atul Kaviraje, January 20, 2023, 09:59:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-99
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "महात्मा गांधी"

     मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन खर्ची करणारे महान नेता महात्मा गांधी यांचा निबंध मिळवणार आहोत. तुम्ही या निबंधाला माझा आवडता नेता महात्मा गांधी म्हणून देखील वापरू शकतात.

     देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, सर्वांना सत्य आणि अहिंसेच्या मार्ग दाखवणारे गांधीजी अर्थात महात्मा गांधी यांना देशाचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान दिले. गांधीजींच्या वचनांचा भारतीय समाजावर खोल प्रभाव आहे. त्यांनी आपल्या विचारसरणीने भारताला एकत्रित केले. समाजातील अनेक कुरितीना संपवले.

     गांधीजी यांच्या जन्म 2 ऑक्टोंबर 1869 साली गुजरात मधील पोरबंदर या गावात झाला. इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्यासाठी गांधीजींनी अनेक आंदोलने केली. त्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला. असहयोग आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, दलित आंदोलन, भारत छोडो आंदोलन, चंपारण सत्याग्रह इत्यादी ब्रिटिश शासनाविरुद्ध ची आंदोलने करून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात योगदान दिले.

     गांधीजी एक कुशल राजनितिक तर होतेच परंतु ते अतिशय चांगले लेखक देखील होते. आपल्या जीवनातील चढ-उतार त्यांनी लेखणीच्या सहाय्याने मांडले. महात्मा गांधी यांनी हरिजन, इंडियन ऑपिनियन, यंग इंडिया इ. वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केले. गांधीजींनी लिहिलेले प्रमुख पुस्तक हिंद स्वराज्य, दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह, माझ्या स्वप्नातील भारत, ग्रामस्वराज्य व माझे सत्याचे प्रयोग इत्यादी आहेत. गांधीजींची ही पुस्तके आज देखील समाजाला नागरिक घडवण्यासाठी मदत करीत आहे.

     इंग्रजांना भारतातून काढण्यासाठी 9 ऑगस्ट 1942 ला गांधीजींनी शेवटचे आंदोलन 'भारत छोडो' आंदोलनास सुरुवात केली. भारत छोडो स्वातंत्र्य आंदोलन त्या काळातील सर्वात मोठे जनांदोलन होते. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने स्वातंत्र्यसेनानी मारले गेले. इंग्रजांनी गांधीजी सोबत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले. या दरम्यान दुसरे महायुद्ध सुरू झाले. भारत छोडो आंदोलनामुळे भारतीय संघटित झाले. इंग्रजांना भारतावर राज्य करणे कठीण झाले व त्यांनी भारताला स्वातंत्र्य करण्याचे संकेत देऊन टाकले.

     महात्मा गांधींच्या निर्णयाने असहमत असलेल्या नाथूराम गोडसे नावाच्या एका तरुणाने 30 जानेवारी1948 ला महात्मा गांधी यांची छातीत गोळ्या मारून हत्या केली. असे म्हटले जाते की गांधीजींचे शेवटचे शब्द 'हे राम' होते.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.01.2023-शुक्रवार.
=========================================