मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-78-विनोबा भावे

Started by Atul Kaviraje, January 24, 2023, 10:16:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-78
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "विनोबा भावे"

                                     विनोबा भावे--
                                    -----------

     कालच आदरणीय निर्मला देशपांडे लिखित व इंडिया बुक ट्रस्ट तर्फे प्रकाशित "विनोबा" हे विनोबा भावे यांचे चरित्र वाचून झाले. मी हे चरित्र गेले दोन आठवडे वाचत होतो. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळींमध्ये शामिल होऊन ४० हजार किलोमीटर पदयात्रा करणाऱ्या आदरणीय निर्मल देशपांडे या महान व्यक्तिमत्वास प्रणाम !

     महात्मा गांधी यांचे निस्सीम भक्त म्हणजेच विनोबा भावे! गांधीजींनि अस्पृश्यतेला नेहमीच विरोध केला होता. आणि ते आचरणही केले केले होते. साबर्माति मध्ये असताना गांधीच्या सोबत त्यांचे अनेक अनुयायी शामिल होते. अनेक धर्माचे आणि पंथाचे लोक तेथे त्यांच्यासोबत वास्तव करत होते. प्रत्येक जन साबरमती मध्ये असताना स्वावलंबन अनुकरण करीत आपापले काम स्वतःच करीत असे. साबरमती मध्ये असताना अस्पृश्यता निवारणाचाच एक भाग म्हणून भंग्यांचे काम प्रत्येकाने विभागून प्रत्येक दिवशी करण्याचे गांधीजीनी ठरवले. भंगी म्हणून असलेले लोक केवळ हे काम करीत असत. गांधीजीनी हि प्रथा बंद करण्याचे ठरवले. स्वतःसह प्रत्येकाने एकेका दिवशी हे काम स्वीकारावे व पार पाडावे. असे त्यांनी सांगितले. तेव्हा बहुतांश ब्राह्मण असलेले त्यांच्या अनुयायांनी व याला विरोध केला. तेव्हा याप्रसंगी साबरमती सोडण्याची तयारी काही ब्राह्मणांनी केली व ते सोडून गेले. परंतु विनोबांनी मात्र याला विरोध केला नाही. त्यांना गांधीजी ची अस्पृश्यता निवारण करण्याची व सर्वसमावेशक अशी विचारशैली खूप आवडली. त्यांनी अत्यंत नम्रपणे या गोष्टीचा स्वीकार केला. याप्रसंगी त्यांना सनातनी ब्राह्मण असलेले लोकांनी कान भरले व धर्म भ्रष्ट करीत आहात असे सांगितले. तरीही त्यांच्या स्वतःच्या विचारापासून ते डगमगले नाहीत. आपल्या निर्नायाप्रती ठाम असे होते आपले विनोबा भावे ! ( संदर्भ: निर्मल देशपांडे लिखित "विनोबा") महाराष्ट्रात आपण संताना तुकोबा, ज्ञानोबा असे आदराने म्हणतो त्यांच्याच पंगतीमध्ये विनोबा बसतात म्हणून त्यांना आदराने " विनोबा" असे संबोधले जाते हे लक्षात घ्यावे.

     त्याकाळी भारतवर्षामध्ये अत्यंत घाणेरडा प्रकार त्या काळी होता तो म्हणजे " अस्पृश्यता". याला तडा देण्यासाठी गांधीजींसह महामानव डॉ आंबेडकरांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे आहे. विनोबा भावे यांचेही योगदान अत्यंत महत्वाचे आहे. अशा महापुरुषास कोटी कोटी प्रणाम! !

     ब्राम्हणांवर विनाकरण टीका--

     चंद्रशेखर [12 Mar 2013 रोजी 11:30 वा.]--

     तेव्हा बहुतांश ब्राह्मण असलेले त्यांच्या अनुयायांनी व याला विरोध केला. तेव्हा याप्रसंगी साबरमती सोडण्याची तयारी काही ब्राह्मणांनी केली व ते सोडून गेले. परंतु विनोबांनी मात्र याला विरोध केला नाही. त्यांना गांधीजी ची अस्पृश्यता निवारण करण्याची व सर्वसमावेशक अशी विचारशैली खूप आवडली. त्यांनी अत्यंत नम्रपणे या गोष्टीचा स्वीकार केला. याप्रसंगी त्यांना सनातनी ब्राह्मण असलेले लोकांनी कान भरले व धर्म भ्रष्ट करीत आहात असे सांगितले.

--शंकर माने
(March 12, 2013)
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.01.2023-मंगळवार.
=========================================