मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-108-गौतम बुद्ध

Started by Atul Kaviraje, January 29, 2023, 08:49:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-108
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "गौतम बुद्ध"

     भगवान बुध्द ज्यांना गौतम बुद्ध म्हणूनही ओळखले जाते ते जगातील महान धार्मिक गुरूंपैकी एक होते. त्यांनी सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानतेचा संदेश दिला. त्यांची शिकवण आणि गोष्टी बोद्ध धर्माचा आधार आहेत. बौद्धधर्म हा जगभरातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे. या धर्माचे अनुयायी मंगोलिया, थायलंड, श्रीलंका, जपान, चीन, बर्मा इत्यादी देशात मोठ्या प्रमाणात आहेत.

     बुद्धांचे लहानपणी नाव सिद्धार्थ होते. सिद्धार्थ लहानपणापासून चिंतनशील होते. ते त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध ध्यान आणि अध्यात्मिक रहस्या च्या शोधत होते. सिद्धार्थ यांचे वडील एक राजा होते व राजाचे पुत्र असल्याने त्यांना लहानपणापासूनच सर्व सुख सुविधा उपलब्ध होत्या. सिद्धार्थ यांच्या वडिलांना सिद्धार्थ च्या घर सोडण्याची चिंता लागलेली असे. म्हणून त्यांना नेहमी महलात ठेवून जगातील वास्तविकता लपवण्याची प्रयत्न केला जात असे.

     बौद्ध परंपरेत उल्लेख केला आहे की एकदा सिद्धार्थ यांनी महालातून बाहेर पडून रस्त्यावर एक वृद्ध व्यक्ती, एक अस्वस्थ व्यक्ती आणि एक मृत प्रेत पाहिले. हे सर्व पाहिल्यावर ते अस्वस्थ झाले. त्यांच्या लक्षात आले की भौतिक व सांसारिक सुखांनी सत्य प्राप्त करता येणार नाही. म्हणून 29 वर्षाच्या वयात सत्याच्या शोधात त्यांनी आपले महाल सोडले व ते जंगलात गेले. तेथे ज्ञानाच्या प्राप्ती इकडून तिकडे फिरत असताना त्यांची भेट अनेक विद्वान संतांशी झाली. बुद्धांचा गृहत्याग इतिहासात 'महाभिनिशक्रमन' नावाने प्रसिद्ध आहे.

     शेवटी सिद्धार्थ यांनी कठीण शारीरिक पिडा सहन करीत ध्यान आणि तप सुरू केले. जवळपास 6 वर्षे ध्यान केल्यानंतर सिद्धार्थ यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. गंगेच्या किनारी एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना सत्याचे दर्शन झाले. यानंतर त्यांचे नाव सिद्धार्थ चे भगवान बुद्ध झाले. भगवान बुद्धांना ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्या झाडाला बोधी वृक्ष म्हटले जाते. व त्या वृक्षाच्या सभोवतालच्या परिसराला बोध गया म्हटले जाते.

     बुद्धांनी आपल्या तपश्चर्येचे सत्य प्राप्त केले होते. यानंतर काशी मधील सारनाथ येथे त्यांनी आपला पहिला उपदेश दिला. त्यांनी लोकांना सांसारिक दुखपासून दूर जाण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी लोकांना शिकवले की जीवनाचे शेवटचे लक्ष निर्वाण आहे. बुद्धांनी चांगले कर्म करण्याचा संदेश दिला. बौद्ध धर्म सत्य व अहिंसेवर आधारित आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.01.2023-रविवार.
=========================================