मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-95-गॅस-गणराज

Started by Atul Kaviraje, February 10, 2023, 10:41:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-95
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गॅस-गणराज"

                                   गॅस-गणराज --
                                  ------------

     "-श्रद्धेने विचार करा.-हे त्यांचे वाक्य गमतीचे वाटले.विचार करता येतो तो बुद्धीने.श्रद्धेने नव्हे.श्रद्धा ठेवली की विचार खुंटतो.ठप्प होतो.मूर्तीने मनात आणले की सारे काही होते.असे या श्रद्धाळूंना वाटतेच कसे? निर्जीव मूर्तीला मन असू शकते का? बरे.प्राणप्रतिष्ठा करताना काही मंत्र पुटपुटतात आणि मूर्तीच्या छातीच्या डाव्या बाजूला दूर्वांनी पाणी लावतात, म्हणून मन असते असे मानू.मूर्तीत काही सामर्थ्य असते का? गझनीच्या मुहमदाने सोरटी सोमनाथाची मूर्ती फोडली. मुस्लिम आक्रमकांनी अनेक देवमूर्तींचे भंजन केले.कुठल्या मूर्तीने कधी काही प्रतिकार केल्याची नोंद इतिहासात नाही."मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली.देवीच्या अंगावरील दागिने चोरले.मुकुट पळविला.दिवे आगरच्या देवळात चोरटे घुसले.प्रतिकार करू पाहाणार्‍या रक्षकाला जिवे मारले.आपल्या निष्ठावंत सेवकाला देव वाचवू शकला नाही.चोरट्यांनी सुवर्ण गणेश पळवला.तो त्यांच्या बरोबर निमूटपणे गेला." या सर्व सत्य घटनांवर हे तात्या कामत बुद्धीने विचार का करत नाहीत? की श्रद्धेने विचार करू जातात? मला वाटते श्रद्धाळू माणसे अशा वास्तविक घटनांवर विचार करायला घाबरतात.कारण बुद्धीने विचार केला तर मूर्ती म्हणजे निर्जीव बाहुली हे त्यांच्या सहज लक्षात येईल.मग इतकी वर्षे उराशी बाळगलेल्या श्रद्धेचे काय? आपले श्रद्धास्थान निरर्थक ठरले तर कसे व्हायचे? श्रद्धेविना आपण उघडे पडूं.अशी भीती त्यांना वाटते.याविषयी एक किस्सा आहे.
...परवा लक्ष्मी रस्त्यावर भाऊ नेने भेटले.अस्वस्थ दिसले. "काय कसल्या चिंतेत आहात ?" त्यांना विचारले.म्हणाले,
"अहो, घरून निघताना खरेदीसाठी ५००रु.च्या सहा नोटा घेतल्या होत्या.त्यातील एकही आता दिेसत नाही."
"सगळे खिसे,पाकिटे तपासली का?"
"हो. हा पु्ढचा,पट्ट्याजवळचा लहानसा खिसा तेव्हढा राहिलाय."
"त्यात त्या नोटा असण्याची शक्यताच नाही काय?"
"आहे.तशी शक्यता आहे."
"अहो,मग बघा की!"
" आणि त्यात नोटा नसल्या तर काय करूं? त्या तिथे असतील या आशेवर मी आहे."
"म्हणजे नोटा त्या खिशात आहेत अशी तुमची श्रद्धा आहे.तिचा खरे-खोटेपणा तपासायला म्हणजे चिकित्सा करायला तुमचे मन धजावत नाही."
"तसे म्हणा हवे तर.पण मी काय करूं?"

     आपल्या श्रद्धेची चिकित्सा करण्याचे धैर्य श्रद्धावंतांना नसते.श्रद्धा खोटी ठरली तर काय करायचे? अशी भीती त्यांना असते."देवावर माझी श्रद्धा आहे.तो संकटात धावून येईल.मला तारून नेईल " अशा श्रद्धेच्या अवगुंठनात राहाणे त्यांना सुरक्षित वाटते.देवाने काहीच केले नाही (तो कधी काही करत नाहीच) तरी त्यांची श्रद्धा ढळत नाही.देव आपल्या श्रद्धेची परीक्षा पाहातो आहे असे काहीतरी मानून ते ती श्रद्धा अधिक दृढ करतात.शेवटी अनेकांना नैराश्य येते.काही जणांचे मानसिक संतुलन बिघडते.पण तर्कबुद्धीने विचार करून, निष्कर्ष काढून ते स्वीकारण्याचे धैर्य त्यांच्यापाशी नसते.बालपणापासून मनावर ठसवलेल्या देवश्रद्धेच्या संस्कारांचा विळखा काही सुटत नाही.

--यनावाला
(February 18, 2013)
-----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.02.2023-शुक्रवार.
=========================================