मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-121-शेतकरी

Started by Atul Kaviraje, February 11, 2023, 10:46:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-121
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "शेतकरी"

     भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. भारताच्या या खाद्य संपन्नते मागे शेतकऱ्याचे योगदान मोलाचे आहे. भारत ही शेतकऱ्याची भूमी आहे. आपल्या देशाची 72% लोकसंख्या गावामध्ये राहते व शेती करते. भारतीय शेतकऱ्याचा सर्वकडे सन्मान होतो. कारण शेतकरीच संपूर्ण देशासाठी खाद्य उगवतो. शेतकऱ्याचे जीवन अतिशय व्यस्त असते. शेत नांगरणे, बी लावणे, रात्रंदिवस शेताची राखण करणे इत्यादी कार्यामध्ये शेतकरी कायम गुंतलेला असतो.

     शेतकरी सकाळी लवकर उठतो आपले बैल आणि इतर सर्व सामान घेऊन शेताकडे निघतो. तासनतास तो शेतात काम करतो. शेतकऱ्यांच्या घराचे इतर लोक सुद्धा शेतात त्याची मदत करतात. शेतकऱ्याचे जेवण अतिशय साधे असते. बरेच शेतकरी चटणी भाकर खाऊन दिवस काढत असतात. दुपारी शेतकऱ्यांच्या घरून त्याची पत्नी किंवा दुसरे कोणीतरी जेवण घेऊन येते. शेतकरी जेवण करून काही मिनिटांच्या विश्रांती नंतर पुन्हा आपल्या कामाला लागतो. तो कठीण परिश्रम करतो. पण एवढ्या परिश्रमानंतर देखील त्याला जास्त लाभ होत नाही.

     शेतकऱ्याचे जीवन खूपच साधे असते. त्याचा पेहराव ग्रामीण असतो. बरेच शेतकरी कच्या घरात राहतात. शेतकऱ्याची संपत्ती बैल आणि काही एकर जमीन असते. शेतकरी हा देशाची आत्मा असतो. लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' चा नारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की शेतकरी हा भारताचा आत्मा आहे. म्हणून आज शेतकऱ्याला सरकार द्वारे अधिकाधिक मदत मिळायला हवी. त्यांना शेताचे सर्व आधुनिक यंत्र व कीटनाशके उपलब्ध करून द्यायला हवेत.

     स्वातंत्र्यप्राप्तीच्या अनेक वर्षांनंतर ही शेतकऱ्यांची स्थिती जशीच्या तशी आहे. बऱ्याच शेतकरी कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील कठीण आहे. ज्यामुळे दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या करतात. पण 2015 च्या एका रिपोर्टनुसार आता देशातील शेतकरी आत्महत्या दरात घट झाली आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नष्ट झालेल्या पिकाबद्दल योग्य भरपाई देण्यासाठी कायदे बनवले आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम जमा केली जाते. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला थोडी फार का होईना पण मदत होते.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.02.2023-शनिवार.
=========================================