मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-113

Started by Atul Kaviraje, February 28, 2023, 10:29:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-113
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "समाज रचनेला अर्थ आहे"

                             समाज रचनेला अर्थ आहे--
                            ----------------------

     सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,

नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.

धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }
वैश्य म्हणजे व्यापार करणारे, विविध प्रकारचे उद्योग धंदे करणारे आणि आपल्या साहित्य, मालमत्ता यांच्या रक्षणासाठी त्यातील नफ्याचा काही भाग कराद्वारे राजसत्तेला देणारे.

राजकारण = नोकरी , धंदा करुन हळुहळू/परंपरेने प्राप्त अर्जितावर "साम-ताम-दंड-भेद" द्वारे सत्ता प्राप्त करुन गाव-शहर-तालुका-राज्य-देश चालवणारे..... धूर्त सत्ताधारी मंडळी !{ स्वतःचे व स्व-अनुयायांचे सामर्थ्य दाखवणे व सत्ता काबिज करण्यात सुख मानणारे }
क्षत्रिय म्हणजे समाज व्यवस्था नीट चालावी म्हणून असणारा विश्वस्त अधिकारी, समाज रक्षण करणे, व्यवस्था नीट सांभाळणे इ. त्याची कामे.

समाजकारण = सत्य-अहिंसा-आदि तत्त्वांद्वारे समाजाचे मंगल ईच्छिणारे... धर्मरत...धर्म = मानव धर्म !..... असे सर्व ज्ञान-समुद्रा बुडुन "सर्वे सुखिनः सन्तु..." अशी कामना ठेवणारा..... स्थिरबुद्धी वर्ग !!{ स्वतः पुर्वी सर्व जगाच्या कल्याणात इच्छिण्यात सुख मानणारे }
ब्राह्मण म्हणजे यजन, याजन - यज्ञ करणारा आणि करवून घेणारा, अध्ययन अध्यापन करणारा, दान देणारा (ज्ञानदान, यज्ञदान, औषधांबद्दलचे ज्ञान वापरुन जीवनदान करणारा इ.) आणि घेणारा असा असणे अपेक्षित होते.

    आता ह्या वर्गांस तुम्ही काहीही नाव द्या.....
माझ्या मते मनुंनी त्यांस सर्वश्रुत चतुर्वर्ण व्यवस्था म्हणून नाव दिले. अर्थात ज्यांस हे पटत नाही ते विरोध करतात व ज्यांस हे पटते ते समर्थन !!

     अर्थशास्र , समाजशास्र व नागरिकशास्र वेगवेगळे शिकवून चालत नाही ! नीट एकत्र अभ्यास करणार्‍याचे मत जाणून घेण्यास आवडेल.

     एखाद्या मिल मध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यापेक्षा(wokrers)..... अधिकार्‍यास (officers)व त्यापेक्षा अध्यक्षास (president) जास्त कळतं की कंपनी प्रोफिट मध्ये आहे की लॉस मध्ये व तो तो त्या त्या दिशेने प्रयत्न करतो....आणि ह्या सर्वांना योग्य संयमित नियम ठरवून -एक सर्वकल्याणकारी वेग व दिशा देण्याचे काम कोणी तरी एक बुद्धीवान (orgniser/thinktank)करतो...

     हे सर्व काही आपाअपल्या बुद्धी - स्वभाव -कर्तृत्वाव अवलंबून आहे की आपण कोणत्या वर्गात राहून आपले उदरभरण करतो...सुख कशात मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याने आपण स्वतःच ते ते वर्ग ग्रहण करतो....

     सारांश असा, सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि आजही चारी वर्ण अजूनही अस्तित्वात आहेत ते पुढील प्रमाणे १) नोकरी=शुद्र, २) धंदा=वैश्य, ३) राजकारण=क्षत्रिय व ४) समाजकारण=ब्राम्हण काही शंका???

--समतादर्शन
(January 17, 2013)
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.02.2023-मंगळवार.
=========================================