मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-117-विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी

Started by Atul Kaviraje, March 04, 2023, 10:35:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-117
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी"   

                         विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी--
                        ----------------------------------

8.व्याकरण: दोन शब्दाच्या वाक्याची रचना करा.
विद्यार्थ्याचे उत्तर: माहित नाही.
परीक्षकाची टिप्पणी: तांत्रिकदृष्ट्या हे वाक्य अर्धवट वाटते. फक्त त्यातील 'मला' हा शब्द गाळलेला आहे. परंतु वाक्यातून अर्थबोध होत असल्यामुळे उत्तर बरोबर आहे.
निर्णय: स्वीकारार्ह

9.शब्दसंग्रह: खोका म्हणजे काय?
विद्यार्थ्याचे उत्तर: एक कोटी रुपये
परीक्षकाची टिप्पणी: प्रश्न विचारताना समानार्थी उत्तराची अपेक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्याने या शब्दाला नवीन अर्थ प्राप्त करून दिला आहे. व तो जनसामान्यात रूढ आहे.
निर्णय: स्वीकारार्ह

10. सामाजिक अभ्यास: महात्मा गांधीजी कोण होते?
विद्यार्थ्याचे उत्तर: चौकातील पुतळ्याचे ते नाव आहे.
परीक्षकाची टिप्पणी: भोवतीच्या सूक्ष्म निरीक्षणातून दिलेले हे उत्तर आहे. त्याला प्रश्न कळला आहे. म्हणून उत्तर बरोबर आहे.
निर्णय: स्वीकारार्ह

अशा प्रकारे चाचणी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून इंजिनियरिंगमध्ये त्याला प्रवेश मिळाला.

अजून एका "दीड शहाण्या"ने दिलेली उत्तरं अशी होती:

कुठल्या युद्धात नॅपोलियनचा मृत्यु झाला?
शेवटच्या युद्धात.

बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या सह्या कुठल्या ठिकाणी केल्या?
कागदाच्या पानाच्या शेवटी.

रावी नदी कुठल्या State मधून वाहते?
Liquid state..

घटस्फोटासाठीचे महत्वाचे कारण कोणते?
लग्न....

नापास होण्याचे महत्वाचे कारण कोणते?
परीक्षा....

अर्धा कापलेला सफरचंद कसा दिसतो?
उरलेल्या अर्ध्यासारखा...

निळ्या समुद्रात तांबडा दगड टाकल्यास काय होईल?
दगड ओला होईल.

आठ दिवस झोपेविना माणूस कसा काय राहू शकतो?
त्यात काय विशेष. तो रात्री झोपत असेल.

8 मजूरांना एक भिंत बांधण्यासाठी 4 दिवस लागतात. तर ती भिंत बांधण्यास 4 मजूरांना किती दिवस लागतील?
शून्य दिवस. कारण अगोदरच ही भिंत बांधलेली असते.

याबद्दल अधिक टिप्पणीची गरज नसावी!

--प्रभाकर नानावटी
(January 16, 2013)
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.03.2023-शनिवार.
=========================================