दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन-C

Started by Atul Kaviraje, May 22, 2023, 10:28:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                             "आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन"
                            ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-22.05.2023-सोमवार आहे, 22 मे हा दिवस "आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                      |जैवविविधतेचा ऱ्हास|जैवविविधतेच्या ऱ्हासाची कारणे--

            जैवविविधता नष्ट होण्याची कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील.

१) आपल्या देशाची अगदी वेगाने वाढणारी लोकसंख्या ही जैवविविधता नष्ट होण्याचे प्रमुख कारण आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे अन्नधान्याची गरज वाढली अन्नधान्य वाढवण्यासाठी शेतकरी एक पीक पद्धतीने शेती करू लागला. एक पीक पद्धतीमध्ये ज्या उत्पादन मधून शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळतील त्याच पिकाची लागवड शेतकऱ्यांनी सुरू केली. यामुळे वेगवेगळी पिके घेण्याची पारंपारिक शेतीची पद्धती खंडित झाली एक पीक पद्धतीचे प्रमाण वाढले. परंतु या एक पीक पद्धतीमुळे वनस्पतींमधील विविधता धोक्यात आली.

२) मुलांच्या बाबतीत देखील असेच झाले गुरांच्या स्थानिक जातींची जागा संकरित अशा परकीय जातीने घेतली त्यामुळे स्थानिक प्रजाती धोक्यात आल्या.

३) मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक प्रजातींच्या वनस्पतींची तोड केली. जसे की चंदनाचे झाडांची चोरी, सागाच्या झाडांची चोरी.

४) अवैध मार्गाने प्राण्यांची शिकार केली जाते आहे त्यामुळे प्राण्यांच्या जाती आणि त्यांची संख्या देखील कमी होत आहे. मानवाच्या अशा बेजबाबदार वागण्याने अनेक जाती संकटग्रस्त तर काही जाती दुर्मिळ झालेल्या आहेत. काही प्राणी तर नामशेष झाले आहेत.

५) वाढत्या लोकसंख्येमुळे एवढ्या लोकांना राहण्यासाठी जागेची गरज हसत आहे ही जागा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून मोकळी केली जात आहे. यामुळे अनेक वनस्पती नष्ट झाली झाल्या व त्या ठिकाणी माणसांच्या वसाहती वाढत आहेत.

६) मोठ मोठ्या धरणांचे काम करणे रस्त्यांचे काम करणे उद्योगधंद्यांसाठी बांधकाम करणे खाली खोदणे यामुळे खनिजांचा आणि नैसर्गिक स्त्रोत यांचा बेसुमार वापर होतो आहे अशा प्रकारच्या बांधकामांमुळे जैवविविधतेने समृद्ध असलेल्या अधिवासांचा नाश होतो आहे.

७) ध्वनीप्रदूषण ,जलप्रदूषण ,वायूप्रदूषण या प्रकारच्या प्रदूषणामुळे अनेक जलचर नष्ट झाले. वायू प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या या प्रजाती नष्ट होऊ लागलेल्या आहेत. प्रदूषण वाढल्यामुळे हवामानात बदल झाले व नैसर्गिक अधिवासामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून आलेली आहे.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-उपकार मराठी.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.05.2023-सोमवार.
=========================================