दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय भूमिपूत्र दिन-C

Started by Atul Kaviraje, August 09, 2023, 04:59:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                              "आंतरराष्ट्रीय भूमिपूत्र दिन"
                             ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 09.08.2023-बुधवार आहे.  ९ ऑगस्ट-हा दिवस "आंतरराष्ट्रीय भूमिपूत्र दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे सदस्य समीर दुधगावकर यांनी अशा प्रकारचा निर्णय घेताना सगळ्या बाजूंचा विचार करण्याची गरज असल्याचं सांगितलं.

     दुधगावकर सांगतात, "स्थानिकांना रोजगार मिळावा, याबाबत मागणी करणाऱ्या व्यक्तींचा उद्देश चांगलाच असतो. स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे. पण उद्योजकांच्या बाजूसुद्धा समजून घ्यायला हवी. उद्योजकांना रोज चांगल्या पद्धतीने काम करणारे लोक हवे असतात. त्यांनी अनेक ठिकाणांहून कर्ज घेतलं असतं. त्याचे हप्ते भरायचे असतात. त्यामुळे उद्योजकाकडे जास्त पर्याय उपलब्ध नसतात."

     "साधारणपणे खासगी क्षेत्रात कामावर घेताना चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला कामावर ठेवलं जातं. एखादा माणूस अत्यंत गरजू आणि कामाचा माणूस असेल तर त्याला त्या निर्णयाचा फायदा नक्की होईल.

     स्थानिक असो वा बाहेरचा, त्यांच्यातून चांगले काम करणारे लोक शोधावे लागतात, नाहीतर त्याचा कामावर वाईट परिणाम होतो. अशा कायद्यामुळे काही लोकांना जबरदस्तीने कामावर घ्यावं लागत असेल तर उद्योग बंद पडतात, अशी निरीक्षण ते व्यक्त करतात.

     "मागच्या वेळी एकदा अशी स्थिती निर्माण झाली होती. पण नंतर त्यातील नुकसान समजून आलं. त्यामुळे नोकऱ्यांतील आरक्षणाबाबत संपूर्ण विचार करणं आवश्यक आहे.

     कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याची जबाबदारी उद्योजकांनी घेऊन त्यांनी स्थानिकांना प्रशिक्षित करावं, अशी आंध्र प्रदेशच्या कायद्यात तरतूद आहे. पण स्थानिकांना प्रशिक्षण देण्याचा खर्च कुठून येईल, हा प्रश्न दुधगावकर यांनी उपस्थित केला.

     "उद्योजकांनी प्रशिक्षित करायचं असेल तर शिक्षण संस्थांची भूमिका काय असेल? जर उद्योजकांकडूनच सगळं काम करून घ्यायचं असेल तर शिक्षण संस्था काय कामाच्या? प्रशिक्षणासाठी गुंतवणूक सरकार करत असेल तर नक्कीच उमेदवारांना प्रशिक्षित करता येईल," असं ते म्हणाले.

     दुधगावकर पुढे सांगतात, "स्थानिक किंवा परप्रांतातील असा कोणताही फरक उद्योजक करत नसतो. कुशल असलेल्या व्यक्तीला हमखास नोकरी मिळते. कामाचा दर्जा योग्य असणं महत्त्वाचं."

     "कुशल कामगारांची कमतरता आहे. त्यांची संख्या वाढायला हवी. तसंच काम करण्याची प्रवृत्ती वाढवण्यावर सरकारने भर दिला पाहिजे. देशातले तरुण खूप हुशार आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणं गरजेचं आहे," असंही दुधगावकर यांना वाटतं.

--प्राजक्ता पोळ आणि हर्षल आकुडे
--बीबीसी मराठी प्रतिनिधी
-------------------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-bbc.कॉम)
                        ------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2023-बुधवार.
=========================================