दिन-विशेष-लेख-गुरू तेग बहादूर शहीदी दिवस-B

Started by Atul Kaviraje, November 24, 2023, 09:26:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  "दिन-विशेष-लेख"
                           "गुरू तेग बहादूर शहीदी दिवस"
                          -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.11.2023-शुक्रवार आहे.  २४ नोव्हेंबर, हा दिवस "गुरू तेग बहादूर शहीदी दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत--(लेख क्रमांक-१)

पण गुरू तेग बहादूर यांच्या या शब्दांचा औरंगजेबावर काहीही परिणाम झाला नाही. औरंगजेबाच्या दरबारात जे उलेमा होते त्यांनी औरंगजेबाचे कान भरले. त्यांनी औरंगजेबाला सांगितलं की, तेग बहादूरांचा वाढता प्रभाव इस्लामसाठी धोकादायक ठरू शकतो."

त्यामुळे औरंगजेबाने त्यांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. पण औरंगजेबाच्या दरबारात असलेला एक राजपूत मंत्री राजा रामसिंहाने त्यांना जिवंत सोडण्याची विनंती केली. आणि औरंगजेबाने राजपूत मंत्र्यांची विनंती मान्य केली.

जवळपास एक महिना गेला. डिसेंबर महिन्यात गुरु तेग बहादूर यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आणि त्यांची सुटका करण्यात आली. त्यांची सुटका होताच त्यांनी पूर्वेकडचा प्रवास पुन्हा सुरू केला. ते मथुरा, आग्रा, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, बोधगया मार्गे पाटण्याला पोहोचले.

गुरु तेग बहादूर यांच्या पत्नी माता गुजरी यांनी तिथंच राहायचं असं ठरवलं. पण गुरु तेग बहादूर यांना त्यांच्या अनुयायांना भेटण्यासाठी ढाक्याकडे जायचं होतं.

ढाक्यात असतानाच त्यांना मुलगा झाल्याची बातमी मिळाली. त्यांच्या मुलाचं नाव गोविंद राय ठेवण्यात आलं. पण पुढे जाऊन त्यांना गुरु गोविंद सिंग या नावाने ओळखलं जाऊ लागलं.

          आसाममध्ये तीन वर्षांचं वास्तव्य--

याच दरम्यान कामरूपच्या राजाने बंड केलं होतं. त्याचं हे बंड शमविण्यासाठी औरंगजेबाने राजा रामसिंग याच्यावर जबाबदारी सोपवली.

त्या काळात कामरूपला धोकादायक मानलं जायचं, कारण इथल्या शूर योद्ध्यांची आणि काळ्या जादूची चर्चा असायची. राजा राम सिंह यांचा गुरु तेग बहादूर यांच्या आध्यात्मिक सामर्थ्यावर प्रचंड विश्वास होता.

राजा राम सिंहाने गुरू तेग बहादूर यांना कामरूपच्या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली. आणि तेग बहादूरांनी देखील ती विनंती नाकारली नाही.

सरबप्रीत सिंह लिहितात, "या युद्धाच्या कालावधीत तेग बहादूर यांनी आसाममध्ये तीन वर्ष घालवली. या दरम्यान त्यांनी मध्यस्थांची भूमिका पार पाडली.

पाटण्यात आल्यावर त्यांना पंजाबमध्ये येण्याची विनंती करण्यात आली, कारण पंजाबमध्ये त्यांची गरज होती, त्यामुळं त्यांना त्यांच्या पत्नीला भेटता आलं नाही.

मार्च 1672 मध्ये ते चक नानकीच्या गादीवर परतले. त्यांनी अशा ठिकाणी प्रवास केला, जिथं गुरू नानक वगळता इतर कोणत्याही शीख गुरूंनी भेट दिली नव्हती."

--Author-रेहान फझल
---------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-बी बी सी.कॉम)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================