जगण्याच्या वाटेवरती मरणाची भेट घडते।
मरणाच्या दारी तेव्हा जगण्याची किँमत कळते।
जन्माला येणार्याची शेवटी होतेच माती।
पैशाचे ढीग रत्नांच्या राशी न अंती कामी येती।
शेवटच्या प्रवासाकरिता लागती चार खांदे।
त्यासाठी जोडावे जगताना जिवलग मित्र खंदे।
मैत्रीचा हा महिमा आणखी वर्णावा किती।
मित्रांची साथ मिळता न उरे कळिकाळाची भिती।
©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१ / ०९ /२०११