मैत्री
एखाद्यावर ठेवता येणार्या
अतूट विश्वासाचं;
मनापासून सांगता येणार्या
गूढ गोष्टींचं;
भरभरुन देता येणार्या प्रेमाचं;
सुखात-आनंदात खळखळणार्या हास्याचं;
आणि दु:खातही सांभाळल्या जाणार्या अश्रूंचं;
असं एक नातं असतं,—–
आयुष्यासाठी लागणार्या सहवासाचं;
जगातल्या सर्व चांगल्या गोष्टीचं
ते उत्तोमउत्तम असं
एकचं स्थान असतं,——
मनं जिंथे मोकळं होईल,
असं ते एकच “मैत्रीचं गाव” असतं