
:)दिवसामागन दिवस जातात पण जगन मात्र निच्छित असत,
आज पुन्हा सकाळी त्याच वेळेवर उठायाच त्तोडाफार उशीर होईल, पण लगेच दुसर्या कामात तो वेळ अड्जस्ट करायचा,
घरा बाहेर पडल्यानंतर सारख लक्ष्य मात्रा घड्याळ वर ठेवायच,
कधी एक वाजनार आणि मे जेवायला जाणार,
कशी तीन वाजनार आणि सगळे चहा घायला जमतील,
कधी पाच वाजनार आणि मला ऑफीस मधून घरी जायला मिळेल,
घरी जाता जाताउरलेली कामे पूर्णा करायची,
मग पुन्हा जेवताना एकतर घरच्यांशी कोणत्याही विषयावर चर्चा करायची किवा गप्प टीवी वर जो कार्यक्रम चालू असेल तो बघायचा,
शेवटी उद्या पुन्हा लवकर उठायाच या विचाराने लवकर झोपायच,
मित्राणो ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आपण आजचा दिवस किती सुंदर आपण बनवु शकतो हे विसरतो, आयुष्य हे एकदाच मिळत ते पूर्णपणे जगा,
अश्या कोणत्याही गोष्टी करू नका की जेणेकरून तुम्हाला ह्या आयुष्यचाच कंटाळा येईल,
मग बघा प्रत्येक दिवशी तुम्हाला झोपेतून उठण्याची आतुरता असेल.
