मनात असतो विचारांचा काहूर
तरी शब्दा येत नाहीत ओठांवर
खूप काही सांगायचा असत
तेव्हा नसत कोणीही आपल्यासमोर
किती वेळा वाटत की आता
सोडून द्यावेत हे पाश मायेचे
पण नाही सुटत ते रेशमी बंध
आपल्याच नात्यातील कर्तव्याचे
रक्ताची नाती तर
"रेडीमेड" मिळतात
आणि बाकीची म्हणे
"कस्टमाइज़्ड" असतात
तरी "इट्स माइ चाय्स" हा
असतो निव्वळ एक भास
सगळा आधीच असत
"त्यानी" ठरवलेल खास
त्यातूनच मग जुळतात का
काहींचे सूर अनॉखे
आणि त्यालाच म्हणायचे का
आपण मैत्रीचे नाते?