चिलटाच्या प्रेमाबद्दल सारं माहित आहे
आगीमध्ये स्वत:हून जळलो सुद्धा आहे
पण प्रेमामध्ये 'पडणं' असतं, 'उठणं' असत नाही
पावलं आपली असली तरी चाल कळत नाही..
.
.
.
.
आजकाल लिहिताना यमक जुळत नाही
ताल कधी चुकतो, कधी छंद जमत नाही
शिवशिवणारे हात, त्यांना आवरणं होत नाही
शब्दांच्या कारंज्यांनी नेम साधत नाही
लिहायचं असतं एक, लिहितो मी भलतंच
विचारचक्र फिरून फिरून तुझ्यापाशी थांबतंच
खूप ठरवलं, तुझ्याबद्दल काहीच नाही लिहायचं
ह्रदय ठेवून बाजूला, डोक्यानं चालायचं
पण मेंदूसुद्धा फितूर, तुझाच विचार करतो
'नाही नाही' म्हणता सारा कागद भरून जातो
कुठून सुचलं, कसं लिहिलं; काहीच कळत नाही
ताल कधी चुकतो, कधी छंद जमत नाही
....रसप....