कधी कधी मनाची
अशी अवस्था का होते,
विचारच विचार आणि मग
अचानक निराशा येते.
आशेच्या हिंदोळ्यावर झूलताना
मन हे अचानक उन्मळून पडते,
स्वत:ला आवर घालता घालता
परिस्थितीच हाताबाहेर निघून जाते.
आठवणींच्या लाटेवरून फिरूनी
मन हे जेव्हा परतून येते,
डोळ्यांच्या किना-यावर अलगद
अश्रुंचा पाऊस का पाडून जाते.
- संतोषी साळस्कर.