'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा' या शिवरायांच्या सूत्राची पुरती ओळख आजही आम्हाला पटलेली नाही. 'मराठा' म्हणजे महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक. अशा प्रत्येकाला राजांनी जवळ केले. जाती-जातींमध्ये आज जो विखार दिसतो आहे, तसा तेव्हा असता तर शिवरायांचे स्वप्न साकारच होऊ शकले नसते.