वैशाख वणवा
पेटला आहे
रानी-वनी या चोहीकडे,
पानं-फुलेही सुकली आहे
रौनक नाही कुणीकडे,,
बहराया हे वन पुन्हा
बरस रे मेघा...बरस...
आठवणी त्या पावसाळी
अंधुकशा तिच्या सवेच्या
चोर पावले होती भेटी,
जांभळीच्या झाडाखाली होती
तिच्या मनीच्या गुज-गोष्टी,,
मोहराया हे मन पुन्हा
बरस रे मेघा...बरस...
साद घालीत गडगड वाजीत
श्रावण कसा ऐटित आला
धुंद मनी ही कुंद हवा,
मनात भिनलाय
स्पर्शाचा नाजुक गारवा,,
तरतराया हे तन पुन्हा
बरस रे मेघा...बरस...
वाट पाहुनी तिची
आज ती आलीये
सहवासाचे धन घेऊनी,
न जावो ती
विरहाचे दु:ख देऊनी,,
भरभराया हे धन पुन्हा
बरस रे मेघा...बरस...
--------------मनोज
१६.६.२००९