आगळ्या प्रेमाची वेगळी कहाणी...
तिना मना जनम
एकाच वकताले झालता..
मायबाप म्हनलं,
सुगीचा वकत बी तवाच आलता...
शाया शिकाले आमी
संग संगच जायचो..
बुट्टि मारुन कधी
दिस दिसभर फिरायचो...
धाकलपनी आमी
नवरा-नवरी खेळायचो..
ती मनी नवरी
मी तिना नवरा रायचो...
तवाच मना मन मा
पयलं प्रेम खुललं..
पर म्या तिला कधी
आय लव यु नाय म्हनलं...
ती अन म्या यकदा
पिच्चरला गेलतो..
आय लव यु म्हनली
मी तर तवा पुरता मेलतो..
म्हनली, तु मना बंटी
अन् मी तुनी बबली हाय..
म्हनलं, बाप मारेल
जराशी सांभाळुनच राय...
"अरे येड्या, खोटं खोटं
पिच्चरचा डायलाग म्हनुन पायला..
मनातला किडा मात्र
शब्दाभवतीच घोळत रायला...
तिनी गाडि डिस्टिन्कशला
एका मार्काने अडली..
तवा मनी इकडं
पास व्हायची बोंब पडली...
पुढल्या शिक्षणासाठी ती
शहरामधी गेली..
खरं तर शादीची आशा
तवाच अर्धी मेली...
परत आली यकदा
कुनी साहेबही सोबत व्हता..
मले भेटाले उनती
पर मना गावामा ठिकाना नव्हता...
म्या येड्यागत आपलं
माळरानावर जाऊन बसलो..
प्रेम बिम म्हनत म्हनत
सोताच सोताशी फसलो...
शादी ले गेलो व्हतो तिच्या
आंदनात मनं मनच दिलं..
पर तवा बी तिले
आय लव यु नाय म्हनलं...
---------------मनोज
१८ नोव्हेंबर २००९