स्मृती त्या.
वृक्ष तरू लता जेंव्हा या यॊवनात आल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.
आली चॆत्रपालवी जेंव्हा फुलवीत सृष्टी,
ओघळले निर्झर जेंव्हा खळाळत्या कंठी,
गीतांच्या त्या सुंदर ओळी ओठांवरी आल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.
भटकलो माळावरी स्वच्छंदी खूणेच्या मंदिरी,
चिंबवले जेव्हा बेछूट तुफानी या धारांनी,
स्पर्शाच्या बेभान त्या स्मृती अनावर झाल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.
भुललो जेंव्हा त्या सॊंदर्यास या ताटव्याच्या,
मती गुंग झाली सुगंधाने त्या फुलांच्या.
काटयांनी अवचित जखमा बंबाळ केल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.
प्रल्हाद दुधाळ.
....काही असे काही तसे!