***** आजची वात्रटिका *****
***************************
२६/११ ते २०/११
कुणाचाही कुणावर असो
शेवटी हल्ला हा हल्ला असतो.
आपण गप्प बसलो की,
भ्याडांचा असा पल्ला असतो.
हेही खरे की,
करावे तसे भरावे लागते.
दु:ख याचे की,पत्रकारालाच
हल्ल्याचे समर्थन करावे लागते.
विचारांनीच विचारांना
निश्चितपणे मारले पाहिजे !
आता पत्रकारांनीच
पत्रकारितेला तारले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)