***** आजची वात्रटिका *****
*****************************
महानगर ते आयबीएन
तेंव्हा घडले,आताही घडले
पुन्हा तेच सगळे आहे.
पत्रकारितेच्या हल्ल्यातले
फक्त माध्यम वेगळे आहे.
असल्या भ्याड विकृतीला
विचारांनीच झुकवायला हवे !
ठोकशाहीशी झुंजताना
आपल्याही आत डोकवायला हवे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)