***** आजची वात्रटिका *****
*****************************
ज्वाला बने ज्योती
२६/११ नंतर पेटलेली
ती आग,आग राहिली नाही.
तेंव्हा जी आली होती
ती जाग,जाग राहिली नाही.
हा महिमा काळाचा की,
आम्हीच विसराळू आहोत?
आम्हांस ना देणे-घेणे कशाचे
आम्ही फक्त दिवसपाळू आहोत?
त्या लवलवत्या ज्वालांच्या
पुन्हा ज्योती झाल्या आहेत.
नका करू कुणी खुलासे,
सार्या गोष्टी ध्यानी आल्या आहेत.
झटका भोवतालची राख
आतले निखारे धगधगु द्या !
दुश्मनांची हिंमत होईल कशी?
त्यांना हे निखारे बघू द्या !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
आणखी वात्रटिका वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या.
http://suryakantdolase.blogspot.com/