***** आजची वात्रटिका *****
****************************
ॠणमुक्ती
चांगली भाषणं झॊडली म्हणजे
आपण देशभक्त होत नाही.
फक्त श्रद्धांजल्या वाहून
आपण ॠणमुक्त होत नाही.
देशभक्ती प्रासंगिक नको
ती मनामनात भिनली पाहिजे !
ती दाखवायची गरज नाही
बघणार्यांनी जाणली पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)