***** आजची वात्रटिका *****
*****************************
संमेलनाचा नैतिक विजय
वादाने वाद वाढत गेला
म्हणूनच ही घटका आली.
माणिकचंदच्या गुटख्यातून
संमेलनाची सुटका झाली.
प्रतिष्ठेचे बुरखे असे
टराटरा फाडले पाहिजेत !
सहित्य संमेलनातून
पेताड साहित्यिकही
असेच बाहेर काढले पाहिजेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)