या आयुष्यावर बोलू काही,
तस बोलन्या सारखे काहीच नाही.
सगळे आपले-परके आहेतच आयुष्यात,
पण,मन ओळखन्याचि तसदी कोणी घेतच नाही.
या आयुष्यावर बोलू काही,
तस बोलन्या सारखे काहीच नाही.
आयुष्य म्हणजे सजलेली सुन्दर महफ़िल,
हयात रमनारयाची काही कमीच नाही,
दिवस मावळतो तशी ह्याची रौनक वाढते,
पण महफ़िल संपल्यावर कोणी उरतच नाही.
या आयुष्यावर बोलू काही,
तस बोलन्या सारखे काहीच नाही.
कधी नकोशी वाटणारी लोकांची गर्दी असते,
तर कधी बोचनारा हवासा एकांत राही,
मग कधीतरी वाटते,
कोणीतरी असावे जो मनात आपल्या झाकून पाहिल,
पण मग कळते जवळ कोणी नाही.
या आयुष्यावर बोलू काही,
तस बोलन्या सारखे काहीच नाही.
आयुष्य हे स्वप्न आहे,
स्वप्नात नेहमी कोणीतरी राही.
पण मनाला हे कळतचनाही,स्वप्न कधी पूर्ण होताच नाही.
आणि ह्या अर्ध्या स्वप्नान बरोबर,
मन आपले एकटेच राही.
या आयुष्यावर बोलू काही,
तस बोलन्या सारखे काहीच नाही.....