खूप वाईट घडल आपल्यात मलाही माहित आहे.
म्हणून तू मला विसरून जाणे हे चूकीचे आहे ना रे...
आपणच ठरवल होत ना रे
कधीच सोडायची नाही साथ एकमेकांची
पण, आयुष्यात कुठे काय ते मोठे वादळ आले
अन्, आपल्याला एकमेकांपासून दूर करून गेले....
कधीतरी विचार कर रे परत येण्याचा
मी नाही काही बोलेन तुला
तू फक्त माझ्याकडे येण्याचा प्रयत्न तर कर
मी स्विकारेन तुला सगळ्या दुःखा सहित
नको देऊस सुख मला
पण असा एकटा तरी नको सोडून जाऊस....
माहित आहे रे मला
तू फार जिद्दी आहे
नाही येणार तू परत तरी मी वाट पाहिन तुझी
या श्वासाचा अंत होई पर्यंत....
नेहा म्हात्रे.