समर्थ रामदास स्वामि आणि छत्रपति शिवाजी महाराज यांची माफी मागुन पुढील कविता सादर करत आहे.

कृपया कशी वाटली ते जरुर कळवा.

---------------------------------------------
भ्रष्टाचाराचा महामेरु!
माफिया, काळाबाजारवाल्यांचा आधारु
अखंड अस्थिरतेचा जनकू!
श्रीमंत राजकारणी
पावसात सडती गव्हाच्या राशी!
अन् जनता उपाशी
तयांची बारगेनिंग पावर!
उपद्रवमुल्य तुळणा कैंची?
मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री!
शेती, खाद्य-सार्वजनिक वितरण मंत्री
अनेक संघटनांच्या प्रमुखपदि!
मिरवति ते मानानी
बारामति आणि शक्ति!
पृष्ठभागी
भ्रष्टवंत, अनितिवंत!
अजाणता राजा
- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)
