सुख आणि दु:ख

Started by ♥ shashi B Kavita ♥, January 26, 2013, 08:05:29 AM

Previous topic - Next topic

♥ shashi B Kavita ♥

जर सुखातच  नांदत गेलो ,तर दु:ख  काय ते काळले  नसते .
             जर दु:खाचा डोंगर कोसळला नसता ,
             तर सुखाची किंमत नसती .
दु:खाच्या मागे सुख दाडलेले  आहे ते विसरायचे नसते ,
    सुख-दु:खाची सावली जीवनात येत जात असते
       सुखाचे दिवस आले की ,हवेत उडायचे नसते .
    दु:खाने पाठलाग केला की ,हिंमत हरायची नसते .
                सुखात जसे आनंदाने जगतो ,
तसे दु:खाच्या प्रसंगात पण हिंमातीने जगायचे असते .
          या जगात खूपच माणसे दु:खी आहेत .
            त्यांचा पण विचार करायाचा असतो
         दु:ख कुणाच्या कायमस्वरूपी राहत नाही ,
              हे मनात समजून घायचे असते .
सुखाचा  दिवस आला की दु:खी माणसांना विसरायचे नसते ,
चला जगू या आनंदाने परमेश्वराची आपल्यावर कृपा वाहतच असते .
               ज्यांनी आपल्याला हे जग दाखविले ,
               त्यांचे उपकार विसरायचे नसतात .
         दु:ख देणारा आणि सुख देणारा पण तोच असतो
                  दु:ख त्यांनी दिले नसते  ,
     तर त्यांनाच आपण हमखास विसरलो आसतो.