सईसाठी कविता

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 12, 2013, 08:31:45 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

      सईसाठी कविता

.
.
कविता तेंव्हाही सुचतात...
जेंव्हा सोबती कुणी नसते...
विरानीच्या वाटेवरती...
जेंव्हा गणित आयुष्याचे चुकते...
.
.
शब्दही बंदिस्त आरक्त या ओठी...
तिथं यमकछंदांच काय...?
अबोल भावना जर मनी दबल्या...
तिथं व्याकरणाचं काय...?
.
.
भावनेला या जेंव्हा...
शब्दांची जाग येईल...!
थरथरत्या ओठांनी अन दाटलेल्या आसवांनी...
कवितेची तेँव्हा बाग होईल...
.
.
बागेत त्या फुले वेचण्या...
सईही मग दंग होईल...
अवखळ तिझिया ओंजळीतुन...
शब्दगंधांची धारा वाहील....
.
.
अल्लड तिझिया चाळ्यांना...
भावनांची आता किनार  असेल....
हृदयी जपलेल्या स्वप्नांना....
भविष्याची तेंव्हा वाट दिसेल...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

अल्लड तिझिया चाळ्यांना...
भावनांची आता किनार  असेल....
हृदयी जपलेल्या स्वप्नांना....
भविष्याची तेंव्हा वाट दिसेल...
:).खूप मस्तं कविता

कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे सुनिता :)