आपली माणसं परखी होतात तेव्हा...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., November 22, 2013, 10:41:13 PM

Previous topic - Next topic
आपली माणसं परखी होतात तेव्हा...!!

कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परखेच ठरतात.....

स्वतः करत राहतात चुका,
दोश मात्र दुस-यांना देतात.....

स्वतःच्या स्वार्थासाठी,
आपला वापर करतात.....

किती कठोर मनाची असतात माणसे,
दुस-यांच्या दुःखाचा आनंद साजरा करतात.....

कितीही आपलं माना त्यांना,
शेवटी ते मतलबीच ठरतात.....

खोट्या प्रेमाचा आव आणुन,
दुस-यांच्या भावनेशी मनसोक्त खेळतात.....

अगोदर जिवाला जीव देण्याची भाषा करुन,
शेवटी आपला जीव घेऊन निघून जातात.....

कितीही कठोर असली तरी अशी माणसे,
आयुष्यात शेवटी नेहमी आठवत राहतात.....
:'(   :'(   :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २२-११-२०१३...
दुपारी ०२,४८...
© सुरेश सोनावणे.....