२६/११ ते २०/११

Started by suryakant.dolase, November 20, 2009, 11:20:36 PM

Previous topic - Next topic

suryakant.dolase

***** आजची वात्रटिका *****
***************************

२६/११ ते २०/११

कुणाचाही कुणावर असो
शेवटी हल्ला हा हल्ला असतो.
आपण गप्प बसलो की,
भ्याडांचा असा पल्ला असतो.

हेही खरे की,
करावे तसे भरावे लागते.
दु:ख याचे की,पत्रकारालाच
हल्ल्याचे समर्थन करावे लागते.

विचारांनीच विचारांना
निश्चितपणे मारले पाहिजे !
आता पत्रकारांनीच
पत्रकारितेला तारले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

shardul


janki.das

विचारांनीच विचारांना
निश्चितपणे मारले पाहिजे !
आता पत्रकारांनीच
पत्रकारितेला तारले पाहिजे !


या ओळी छान जमुन आल्या .अगधि खर आहे.