एक प्रवास आगी सोबत... 2

Started by शिवाजी सांगळे, August 15, 2015, 04:02:21 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वातावरण गंभीर झालं होतं, परंतु प्रत्येकजण खुप धीराने वागला, सर्वप्रथम मोबाईल व छत्र्या बंद करायला सांगीतल्या, कारण बाहेर विजांचा चांगलाच नाच सुरू होता, दरम्यान पेंटोग्राफ मधुन उडणा-या ठिणग्या चुकवत चुकवत आम्ही सारे पुलाच्या सहाय्याने सावकाश प्लँटफाँर्मच्या उलटया बाजुला उतरलो, खरच त्या दिवशी नशिब बलवत्तर म्हणुन आम्ही सारे एका अनर्थातुन बचावलो.

पेंटोग्राफ मधुन उडणा-या ठिणग्या पासुन दूर जाण्यासाठी आम्ही मानवी साखळी करून उलट चालु लागलो होतो, गाडी पासुन ब-यापैकी अंतरावर असतांना पुन्हा एक धमाका झाला, पुन्हा एक लोळ व ठिणग्या उसळल्या, त्याचा फटका काही लोकांना बसला, कित्तेकांना त्या ठीणग्यांमुळे चटके बसले, कुणाचे कपडे जळाले, गाडीतुन उडया मारल्या मुळे काहीना खरचटले, किरकोळ दुखापती झाल्या. त्या गडबडीत आमच्यातील एकाचे घडयाळ हरवले, याची हळहळ सा-यांनाच लागली होती.

आम्ही सुखरूप एका टपरीजवळ पोहचलो, चहाची आँर्डर देतांना लक्षात आले कि आमच्यातील एकजण गायब आहे, पुन्हा ग्रुप मधे टेंन्शन वाढले, त्याला फोन लावायचा प्रयत्न केला तर त्याचा फोन बंद लागत होता, दरम्यान लक्षात आले कि विजा चमकत असल्या मुळे त्याने मोबईल बंद ठेवला असणार! कसाबसा चाहा घेतला व पुन्हा टपरीवर भेटायचे ठरवुन दोन दोनच्या गटाने आम्ही त्याला शोधायला निघालो, बराचवेळ शोधुन त्याचा पत्ता नाही लागला, त्या आधी एका दुकानदाराला विनंती करून त्याच्या फोनवरून एक दोघांच्या घरी सुखरूप असल्याचा निरोप दिला व तसा निरोप ग्रुपमधील सर्वांच्या घरी दयायची व्यवस्था केली. पुढे काय करायचे हे ठरवत असतांनाच समोर तो दिसला, प्रत्येकाच्या मनात भयंकर राग, उस्तुकता, आश्चर्य अशा सगळ्या भावना आल्या होत्या. शेवटी त्याने सांगीतले कि "मी घडयाळ शोधायला परत गेलो, बरीच शोधाशोध केल्यावर सापडले", हे घे... म्हणत त्याने घडयाळ समोर केले... तेव्हा मात्र सगळ्यांचा राग गायब झाला.

येवढया सा-या गोंधळामुळे आधिच घरी जायला खुप उशिर झाला होता, सगळयांना भुका सुध्दा लागल्या होत्या, आमच्या सारखी स्थिती सा-याची झाली होती, प्रत्येकाला घरी जायचे होते, रिक्षा, बस जे वाहन मिळेल त्याने लोक जात होते, अखेरीस खुप मिनतवारी करून आम्ही एका रीक्षावाल्याला बदलापूर पर्यंत आणले व सारे जण आपआपल्या घरी सुखरूप पोहचलो.

मैत्रीचे बंध कसे असतात हे या प्रसंगातुन दिसले, परस्परांची काळजी घेणं, वेळ प्रसंगी कुठलेही काम स्वतःहुन करणं हे कुणालाच सांगावे लागले नाही. चांगले मित्र भेटायला नशीब लागत, मला भेटलेत असे मित्र, आणखी काय हवं असत जीवनात? खरच आजही आम्हा सर्वांनी तो अतुट धागा जपुन ठेवला आहे.

= शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941-+919545976589 email:sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९