बदल परिस्थितीचे ........!

Started by विजय वाठोरे सरसमकर, January 21, 2016, 05:43:55 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

    बदल परिस्थितीचे ........!

कुणी आपुलकीने म्हटलेले दोन शब्द 
आपल्या मना आधार  देऊन जातात
नाविन्याचा ध्यास अन 
जगण्याची नवी दिशा देऊन जातात  !

कुणाच्या स्नेह नजरा
वेलीसारख्या आशा देऊन जातात
तर कुणाच गहिवरलेल बोलण
दगडासही पाझर फोडून जातात !

परिस्थितीचे बदल सर्वांनाच
एका वेगळ्या वळणावर घेऊन जातात
अन सैरभैर त्या विचारांना
खरच प्रचंड बदलून जातात  !

काही वेळा परिस्थिती सतावते अन
नकळतच बदल घडवून येतात
तेव्हा .................
'तू कुठेच चुकत नाहीस ग
परिस्थितीनेच मला बदललंय '
अस वक्तव्य सहज घडून येतात !

कवी :- विजय वाठोरे सरसमकर
मो .नं. 9975593359
दि :- २१ जानेवारी २०१६





pradip kachare



मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती

PR a deep
8551002045